Share

मुंडन करून नाभिक समाजाने केला ठाकरे सरकारचा निषेध!

Published On: 

औरंगाबाद : राज्यातील सलून दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला. या निर्णयास महाराष्ट्र नाभिक महामंडळाने तीव्र विरोध दर्शवून राज्यभर चार टप्प्यात आंदोलन पुकारले. राज्य शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी गुरुवारी ( दि.२२) राज्यभर ठिकठिकाणी मुंडन आंदोलन करण्यात आले. शासनाने नाभिक समाजाला आर्थिक मदत करावी, कर्जाचे हप्ते माफ करण्याची मागणी महामंडळाचे विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे यांनी केली.

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला. हा निर्णय घेताच नाभिक समाजाने आक्रमक भूमिका घेऊन शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. यापूर्वी शासन निर्णयाची होळी, थाळी-घंटानाद आंदोलन, दुकानासमोर शासनाचा निषेध व्यक्त करणारे फलक हाती घेऊन आंदोलन केले. समाजबांधवानी लोकशाही मार्गाने, जमावबंदी आदेशाचे पालन करून हे आंदोलन पार पाडले.

तरीही शासनाने दखल न घेतल्याने समाज बांधवांनी मुंडन करून जाहीर निषेध केला. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील २० पेक्षा सलून व्यावसायिकांनी आतापर्यंत आत्महत्या केली. इतर व्यावसायिकांप्रमाणे सलून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, समाज बांधवाना आर्थिक मदत करावी, कर्जाचे हप्ते माफ करावे अथवा ते भरण्यास वर्षभराची मुदत द्यावी अशी मागणी नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष दत्ता अनारसे, दिलीप अनर्थे, विष्णू वखरे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!