Share

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रेमडेसिवीरवरील सीमाशुल्क केले माफ

Published On: 

नवी दिल्ली- देशभरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर या इंजेक्शनला देशभरात प्रचंड मागणी आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिवीर उपलब्ध नाहीत. ही बाब लक्षात घेऊन सरकारने रेमडेसिवीरसाठी लागणार्या कच्च्या मालावरील सीमाशुल्क माफ केले आहे.

दरम्यान, भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट खूपच भयावह रूप घेऊन आली आहे. दररोज कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येसोबतच रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर औषधाचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी देशभरातील विविध ठिकाणी रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.

औषधनिर्माण विभागाच्या शिफारशीनुसार, तातडीची गरज लक्षात घेऊन महसूल विभागाने रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्याच्या एपीआय / केएसएमवरील सीमा शुल्क माफ केले आहे, अशी माहिती केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. या निर्णयामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची देशांतर्गत उपलब्धता वाढेल असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!