Share

आता शहरात उरलाय ‘इतकाच’ कोरोना लसींचा साठा…

Published On: 

औरंगाबाद : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी, कोरोना लसीने आशादायी चित्र निर्माण केले आहे. मात्र आता कोरोना लसींचा साठा संपण्यातच जमा असल्याचे समजते. महापालिकेने शासनाकडे लसींचा पुरवठा करण्यासाठी मागणी केली आहे. मात्र अजूनपर्यंत शहराचा लस मिळालेल्या नाहीत. सध्या पालिकेकडे दिड हजार लसींचा साठा शिल्लक असल्याचे समजते.

कोरोना संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात व्यस्त असलेल्या महापालिकेचा कोरोना लसींचा साठाही आता संपला आहे. दोन दिवसांपूर्वीच एक पथक लसींचा साठा आणण्यासाठी रवाना झाले आहे. मात्र अद्यापही साठा मिळाला नसल्याने पथक आलेले नाही. उद्या शुक्रवार सकाळपर्यंत दहा हजार लसींचा साठा मिळणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार औरंगाबाद शहरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. आजवर सुमारे ८६ हजार नागरिकांना पालिकेने ३७ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून लस दिली आहे. शासनाकडून महापालिकेला लस पुरविली जाते. पालिकेच्या माध्यमातून विविध आरोग्य केंद्र व दवाखान्यांतून नागरिकांना लस दिली जाते. मात्र मागील दोन दिवसांपासून पालिकेत लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

पालिकेने शासनाकडे लसीची मागणी नोंदवली आहे. मात्र शासनाकडून अद्याप लस उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे आहे तोच लसीचा साठा पुरवून पुरवून वापरला जात आहे. बुधवारी पालिकेकडे ३,५०० लसींचाच साठा शिल्लक होता. त्यातील दीड ते दोन हजार लसींचा वापर गुरुवारी करण्यात आला. त्यामुळे केवळ दीड हजार लस सध्या शिल्लक आहेत. शासनाकडून दहा हजार लसींचा साठा मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!