बीड: जिल्ह्यातील केज तालुक्यात मांजरा धरणाचा कालवा फुटल्याची घटना शुक्रवारी (दि.२६) रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली आहे. यावेळेस लाखो लिटर पाणी वाया गेले. मांजरा धरणातून शेती सिंचनासाठी पाणी देणाऱ्या उजव्या कालव्याला मोठे भगदाड पडले असून त्यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे.
बीड जिल्ह्यातील मांजरा धरण हे बीडसह लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांना सिंचन व पाणीपुरवठा करण्यासाठी वरदान ठरले आहे. यंदा पाऊसही बऱ्यापैकी झाल्यामुळे मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरला आहे. उन्हाळा सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस व इतर पिकांना पाणी देण्यासाठी या कालव्यातून २२ मार्चपासून पाणी सोडण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास उजव्या कालव्याला मोठे भगदाड पडले आणि त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झाले शिवाय या कालव्याचा उपयोग होण्या ऐवजी शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची मांजरा धरणाकडे तसेच कालव्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेतून दिसत आहे. कालव्याची दुरुस्ती त्वरित करावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडून होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- कलारसास्वाद विषय वैकल्पिक न ठेवता पूर्वरत करावा, कला शिक्षकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- ना शिक्का, ना पोस्टर…रुग्ण फिरताहेत बिनघोर!
- फडणवीसांचा नेमका विश्वास आहे तरी कुणावर? मुख्य सचिवांच्या अहवालावरही केले प्रश्न उपस्थित
- शेतकऱ्यांची भारत बंदची हाक, मात्र पंतप्रधान विदेश वारीत व्यस्थ – नाना पटोले
- कोरोनामुळे परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

