Share

‘संपूर्ण शिवसेनाच आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार ?’

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर पायी वारीला परवानगी देण्यात आली नाही. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरित आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे.

मात्र, शेकडो वर्षांची परंपरा असलेली पायी वारी यंदा खंडित न करता काही निर्बंधांसह राज्य सरकारने पार पाडावी यासाठी भाजपसह काही वारकऱ्यांनी आग्रह धरला आहे. तसेच, जर पायी वारी झाली नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा होऊ देणार नाही असा आक्रमक इशारा देखील काही वारकरी संघटनांनी दिला आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरून भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले गेले कित्येक दिवस राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी महाविकास आघाडी सरकारसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांवर निशाणा साधला आहे. ‘उध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार ? म्हणुनच तर वारी विषयी शिवसेनेने अद्याप चकार शब्द काढलेला नाही !’ असा प्रहार आचार्य तुषार भोसले यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!