औरंगाबाद : शिवसेना ही नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारी संघटना आहे. दिलेला शब्द दिलेले आश्वासन, दिलेले वचन पाळणारी ही शिवसेना आहे. शहरात विविध विकास कामे पूर्णत्वास नेऊन नागरिकांना दिलेले आश्वासन, वचनपूर्ती शिवसेना करत आहे. असे प्रतिपादन शिवसेना प्रवक्ते तथा जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी केले.
शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या निधीतून शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. शिवसेनेने औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा धडाका लावला आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात अंबादास दानवे स्वतः विविध विकास कामांचे उद्घाटन करत फिरत आहेत. मात्र उद्घाटन हा फक्त एक बहाणा असून याद्वारे नागरिकांशी संपर्क साधून निवडणुकीची तयारी, तसेच निवडणुकांचा कल घेतला जात आहे.
शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या औरंगाबाद पश्चिम शहरात वाॅर्ड क्रमांक ७३, विष्णुनगर प्रभागातील विष्णूनगर-अरिहंत नगर या मुख्य रस्त्याचे ८५ लाख रुपये खर्चून सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले. या रस्त्याचे लोकार्पण रविवारी (दि.२२) आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे, शहरप्रमुख विजय वाघचौरे, विधानसभा संघटक सुशील खेडकर आदी नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दहीहंडीला परवानगी द्या नाहीतर आंदोलन करु’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला इशारा
- ‘दहीहंडीसाठी कोरोनाचा बाऊ कशाला? ; दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे उभी राहणार’
- श्रुती मराठेचा साडीमधील सुंदर लुक चाहत्यांच्या पसंतीस
- आर माधवनच्या मुलाची निरज चोप्रासोबत होत आहे तुलना
- ‘जनआशीर्वाद यात्रेला लोक आशीर्वाद नाही तर शिव्याशाप देत आहेत’-जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

