पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घटनाक्रमावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. पहाटेच्या शपथविधी वरून चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बोचरी टीका केली होती. याच मुद्द्यावरून महाराष्ट्रातील या दोन बड्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे.
चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र झोपेत असताना पडेल असे देखील भाकित केले होते. त्यावर अजित पवारांनी कडाडून टीका केली होती. त्यामुळे संतापलेल्या चंद्रकांत पाटलांनी ‘अजित पवारांनी भाषा जपून वापरावी’ असा इशाराच दिला होता. आता या वादावर चंद्रकांत पाटील यांना पडदा टाकत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
आमचा राग अजित पवार यांच्यावर नसून दगाबाज शिवसेनेवर असल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. ते पुढं म्हणाले की, अ’जित पवार आणि माझा काही बांधाला बांध नाही. आमचा वैयक्तीक वादही नाही. मात्र ते आमच्या पक्षाबद्दल बोलले तर मी बोलणारच, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलल्यास आम्ही बोलणारच. दरम्यान सरकार पडलं म्हणून माझा आणि देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवार यांच्यावर राग नाहीच. शिवसेनेने आम्हाला दगा दिला, त्यामुळे त्यांच्यावर राग आहे,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. तसेच यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर टीका केली. या सरकारमध्ये कोणत्याही मुद्द्यावर एकवाक्यता नाही. प्रत्येकाला माध्यमांसमोर येण्याची घाई झाल्याचं ते देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- बारावीच्या प्रवेशासाठी महाविद्यालय प्रशासनासमोर पेच, आता प्रतिक्षा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची!
- मुख्यमंत्र्यांसोबत अजित पवार आणि अशोक चव्हाण देखील जाणार पंतप्रधानांच्या भेटीला
- खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना महा डीबीटी बियाण्यांची प्रतीक्षा, प्रशासनाचे मात्र शून्य नियोजन
- डेवॉन कॉनवेने पदार्पणातच मोडला ३९ वर्षापूर्वीचा विक्रम
- …त्यामुळे पेट्रोल-डीझेल दर कमी करण्याची ही योग्य वेळ नाही – पेट्रोलियम मंत्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

