Share

‘भ्रष्टाचार प्रकरणी राज्यातील ११ नव्हे तर २० मंत्री रडारवर’, किरीट सोमय्यांचा इशारा

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांवर विविध प्रकरणांवरून ईडी, सीबीआयची कारवाई सुरू आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या इशाऱ्यानूसारच राजकीय हेतूने ही कारवाई होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे. मात्र, तरीही सोमय्या काही कालावधीच्या अंतरावर एकेका मंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत तक्रार दाखल करत आहेत.

त्यानंतर आता ठाकरे सरकारमधील ११ नव्हे तर २० मंत्र्याचे भ्रष्टाचार लवकरच बाहेर येणार असल्याचा गौप्यस्फोट सोमय्या यांनी केला आहे. अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक आणि अनिल परबही जेलमध्ये जातील. त्यावेळी सर्वांचीच झोप उडेल, असेही ते म्हणालेत. सोमय्या यांनी आज रविवारी पाचपाखाडी येथील केबीपी महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ११ भ्रष्टाचारी नेते आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती मला कुठून येते हे मी तुम्हाला का सांगू? मला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबतचीही माहिती मिळत असते. आता ११ ऐवजी २० मंत्र्यांची नावे लवकरच समोर येतील. मला अनेक ठिकाणाहून फोन येतात. उद्या कोण टार्गेट आहे असे विचारले जाते. कोणाचा भ्रष्टाचार बाहेर येणार असे विचारण्यात येते, असे त्यांनी सांगितले. तसेच मी नुकताच कोल्हापूरला जाऊन आलो आहे. अंबाबाईचा आशीर्वाद घेतला आहे. आता मी बुधवारी बारामतीला जात आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!