मुंबई : द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सतत चर्चेत आहे. दरम्यान, विवेक अग्निहोत्रीने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याचे लोक खूप कौतुक करत आहेत.
व्हिडीओमध्ये विवेक अग्निहोत्री म्हणत आहेत की, “मी जेव्हा चित्रपट बनवत होतो तेव्हा लोक म्हणाले की, तू वेडा झाला आहेस? तू मरशील पण मला ते स्वीकारावं लागलं, मरणं मान्य होतं. भारताच्या अशा खूप जुन्या समस्या आहेत ज्यावर लोक बोलायला घाबरतात. आम्ही डाकूंचे गौरव केले, आम्ही नक्षलवाद्यांचे गौरव केले, समगलर्सचे गौरव केले, आम्ही दहशतवाद्यांचे गौरव केले, हे दुःखद आहे. छळ करून कोणीही दहशतवादी होत नाही.”
विवेक अग्निहोत्री पुढे असेही की, “यासिन मलिकचा कोणाकडून छळ झाला नाही, हा फिज सईदचा कोणी छळ केला नाही, बुरहान वानीचा कोणाकडून छळ झाला नाही, अफझल गुरूचा छळ झाला झाला आणि माझ्यापेक्षा जास्त काश्मीरवर कोणीही संशोधन केलेले नाही. हे खोटे मी उघड केले आहे. नवा भारत घडवा, भविष्य तुमच्या हातात आहे.
महत्वाच्या बातम्या :


