Share

IPL 2022: सामना गमावूनही ऋषभ पंतने रचला इतिहास!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलच्या १५ व्या मोसमातील १० वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये गुजरातने दिल्लीवर अवघ्या १४ धावांनी मात केली आहे. प्रथम फलंदाजी करताना टायटन्स संघाने १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सला ९ गडी गमावून केवळ १५७ धावा करता आल्या आणि त्यांनी १४ धावांनी सामना गमावला. मात्र, सामना हरल्यानंतरही दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने इतिहास रचला आहे.

आक्रमक विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (rishabh pant) २०१६ पासून दिल्ली कॅपिटल्सशी (DC) जोडला गेला आहे. प्रत्येक हंगामानुसार त्यांच्या खेळात सुधारणा होत आहे. यासोबतच तो प्रत्येक मोसमात संघासाठी महत्त्वाच्या धावा करताना दिसतो. अशा परिस्थितीत पंतने विशेष कामगिरी केली आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी ते केले आहे जे वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीरसारखे फलंदाजही या फ्रेंचायझीसाठी करू शकले नाहीत.

गुजरात टायटन्सविरुद्ध ४३ धावा करून दिल्लीसाठी २५०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा पहिला खेळाडू ठरला आहे. या फ्रँचायझीसाठी कोणताही फलंदाज हा करिष्मा करू शकला नाही. ऋषभ पंतने दिल्लीसाठी कर्णधार म्हणूनही अप्रतिम कामगिरी केली आहे. ज्यामुळे त्याच्या कर्णधारपदात दिल्ली त्यांचे पहिले जेतेपद मिळवेल अशी आशा चाहत्यांना आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!