Share

‘कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत’; संयुक्त राष्ट्राच्या सभेतील मोदींच्या भाषणावर चिदंबरम यांची टीका

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच विदेश दौऱ्यावर गेले होते. तीन दिवसांचा अमेरिका दौरा करून पंतप्रधान मोदी आज मायदेशी भारतात परतले आहेत. अमेरिका, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया या चार देशांचा समावेश असलेल्या क्वाड परिषद झाल्यानंतर मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची देखील दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. तर, संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत मोदी यांनी काल भाषण केले.

यावेळी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षासह कोरोना महामारी, आंतरराष्ट्रीय प्रश्न, आतंकवाद, भारताचे महत्व अशा विविध विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, मोदींच्या कालच्या भाषणावर काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. ‘मोदींच्या भाषणानंतर कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत,’ असा खोचक टोला चिदंबरम यांनी लगावला आहे.

पी. चिदंबरम यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. ‘जेव्हा पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित केले, तेव्हा मी खूप निराश झालो की फक्त काही जागा भरल्या गेल्या आणि जेव्हा कोणीही टाळ्या वाजवल्या नाही तेव्हा ते आणखी निराशाजनक होते. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमचे मिशन विस्कळीत झाले आहे,’ असा घणाघात चिदंबरम यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!