Share

औरंगाबादेत दोन दिवसात एसटीचा एकही नवीन कर्मचारी रुजू नाही..!

Published On: 

औरंगाबाद: ७ नोव्हेंबर पासून सुरू झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजपर्यंत सुरू आहे. निलंबन, सेवा समाप्ती, बदली, पगारवाढ या सर्व कारणांमुळे रुजू झालेल्या मोजक्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर जिल्ह्यातील काही भागात एसटी धावत आहेत. मात्र अजून पर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झालेल्या नाही. गेल्या दोन दिवसात एकही नवीन कर्मचारी रुजू झालेला नाही. शनिवारी (दि. २५) ९४ बसच्या ३२७ फेऱ्या झाल्या असून ४७९० प्रवाशांनी एसटीने प्रवास केला.

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण यांसह इतर मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दीड महिन्यापासून संप सुरू केलेला आहे. राज्य शासनाकडून पगारवाढ देण्यात आली मात्र कर्मचाऱ्यांनी दिलेली ही पगारवाढ नाकारत विलीनीकरण हवे या मुद्द्यावर आपला संप अजून पर्यंत सुरू ठेवलेला आहे. आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने एक समिती नेमून या समितीस प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

२० डिसेंबर रोजी या संदर्भात पहिली सुनावणी झाली. त्यानंतर पुन्हा एकदा न्यायालयाकडून २२ तारीख देण्यात आली. त्यानंतर आता ५ जानेवारी ही तारीख पुढील सुनावणीसाठी देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रवाशांचेही लक्ष ५ जानेवारीकडे लागलेले आहे. न्यायालयाकडून काय निर्णय घेतला जातो त्यानंतरच संपकरी देखील आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. तोपर्यंत संपावर कायम असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!