Share

‘शिवसेनाप्रमुख कोण होते, तेही सांगून टाका?’, भातखळकरांचा संजय राऊतांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी(Atal Bihar Vajpayee) यांची काल(२५ डिसें.)जयंती होती. त्यांच्या जयंती निमित्त शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी वाजपेयींना आदरांजली वाहिली. तसेच धर्मांध न होतादेखील हिंदुत्वाचं राजकारण करता येतं, हे वाजपेयीनीं दाखवून दिल्याचे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, राऊतांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.

राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. या संदर्भात भातखळकर यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,’शिवसेनाप्रमुख कोण होते, तेही सांगून टाका?’

दरम्यान, प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राऊत म्हणाले होते की,’पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर अटलबिहारी वाजपेयी हे खऱ्या अर्थाने लोकप्रिय नेते होते. उत्तम संसदपटू आणि माणुसकी काय असते, हे त्यांनी दाखवून दिले. हिंदुत्त्वाच्या विचारधारेशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. ‘हिंदू अब मार नही खाएगा’, असे त्यांनी ठणकावून सांगितले. पण त्याचा अर्थ ‘कोई और मार खाएगा’, असा नव्हता. हा देश सगळ्यांचा आहे, देशातील एकात्मता टिकली पाहिजे, हे सूत्र त्यांनी कसोशीने पाळले. धर्मांध न होतादेखील हिंदुत्वाचं राजकारण करता येते, हे त्यांनी दाखवून दिले.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!