🕒 1 min read
मुंबई : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आज पाचवा दिवस आहे. विरोधकांनी विविध मुद्द्यांवरुन प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) घेरले आहे. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शेतीच्या वीजबिलासह इतर प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सदाभाऊ खोत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना म्हणाले, या ठिकाणी बोललं गेलं की आमचं सरकार शेतकऱ्यांना मदत करतं, एव्हडी मदत चालली आहे की, विजेचे बिले चार पट पाच पट वाढवण्यात आली आहेत. यावर मात्र सरकार बोलायला तयार नाही. मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय या महाविकास आघाडी सरकारने. अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
माणसासाठी अन् मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय या महाविकास आघाडी सरकारने.. pic.twitter.com/phy43iPBSE
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) December 26, 2021
शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत, वीज बिल, एसटी कर्मचारी आंदोलन, विदर्भ मराठवाडा निधीवाटप, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आदी प्रश्नाबाबत विरोधक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी माझ्या अनेक प्रश्नांना बगल दिली अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या
- “स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे तोऱ्यात वावरत आहेत”, राऊतांचा राेखठोकमधून मोदींवर प्रहार
- “लोकसभेच्या गॅलरीतून डोकावणारे पत्रकार ही लोकशाहीची खरी…”, लोकसभेत पत्रकार बंदीवर राऊतांची टीका
- ‘खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले’, शिवसेना आ.चंद्रकांत पाटील यांचे टीकास्त्र
- पंतप्रधान मोदींची घोषणा; ‘या’ तारखेपासून सुरु होणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण
- ‘ज्यांच्या पक्षाची अर्थव्यस्था डबघाईला आली, ते देशाची अर्थव्यस्था कशी मजबूत करतील?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
