Share

लसीकरणाबाबत आता लबाडी, खोटेपणा नको ; राहुल गांधींचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

नवी मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार पाहिल्यामुळे धास्तावलेली जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

‘देशाला वेगवान पद्धतीचे लसीकरण गरजेचे असून संपूर्ण देशाचे लसीकरण शक्‍य तितक्‍या लवकर होणे अत्यंत गरजेचे आहे, या बाबतीत लोकांना आता भाजपचे खोटे दावे, भंपक घोषणा आणि लबाडी नको आहेत.’ अशा प्रकारची घणाघाती टीका त्यांनी ट्वीटर च्या माध्यमातून केली आहे. पंतप्रधानांची खोटी प्रतिमा जपण्याचा प्रयत्न भारत सरकारकडून वारंवार केला जात आहे, पण याच नादात करोनाचा मोठा प्रादुर्भाव देशात निर्माण झाला आणि असंख्य लोकांचे यात प्राण गेले असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारने कोविशिल्ड डोसमधील अंतर स्वत:च्या मनानेच वाढवले असल्याची एक बातमी प्रसारित झाली आहे त्याचा दाखलाही राहुल गांधी यांनी आपल्या ट्‌विटर अकाउंटवर दिला आहे.

दरम्यान आता कोरोनावर उपचारांसाठी विकसीत करण्यात आलेलं 2-DG औषध कोरोना विषाणूच्या सर्व व्हेरिअंटवर प्रभावी ठरत असल्याचा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. 2-DG असं या औषधाचं नाव आहे. DRDO च्या इंन्स्टिट्युट ऑफ न्यूक्लिअर मेडिसीन एंड अलाईड सायन्सेसने तयार केलेलं हे औषध पूर्णत: भारतीय बनावटीचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!