🕒 1 min read
मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंड खरेदी प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला गेला आहे. काँग्रेससह शिवसेनेनं या प्रकरणी टीकास्त्र सोडलं होतं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून देखील टीका करण्यात आल्यांनतर भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेच्या टीकेनंतर भाजप युवा मोर्चाने थेट शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला.
भाजप युवा मोर्चाने सेना भवनावर कूच करताच, शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली. एकमेकांना मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली. पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना रोखल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली होती. या परिसरात बराच काळ तणावाची परिस्थिती होती.
दरम्यान, या राड्यानंतर शिवसेना आणि भाजपचे नेते एकमेकांना इशारे देत असून भाजप नेत्यांनी महिला कार्यकर्त्यांसह इतर कार्यकर्त्यांवर हात उचलणाऱ्या शिवसैनिकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणी महिला कार्यकर्त्यांवर हात उचलला गेल्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आंदोलन संपले..पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अटक केली त्यानंतर लपत छपत येतं महिलेवर हात उचलण्यात कसला आलायं पुरूषार्थं
श्री शिवाजीमहाराजांचं नावघेतां…सुभेदाराची सून आठवा आणि तुमचे प्रताप बघा
महाराष्टाच्या पुरोगामी सरकारला हा हल्ला मंजूर आहे का?
या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध https://t.co/0CocvlWaIj— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 16, 2021
‘आंदोलन संपले..पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अटक केली त्यानंतर लपत छपत येत महिलेवर हात उचलण्यात कसला आलायं पुरूषार्थ? श्री शिवाजी महाराजांचं नाव घेतां…सुभेदाराची सून आठवा आणि तुमचे प्रताप बघा. महाराष्ट्राच्या पुरोगामी सरकारला हा हल्ला मंजूर आहे का? ,’ असा सवाल करत चित्रा वाघ यांनी या मारहाणीचा निषेध केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ व्हिडीओचा सो कॉल्ड राड्याशी संबंध नाही; मनसे नेत्याने उडवली शिवसेना-भाजपची खिल्ली
- ज्याने विश्वास ठेवला, त्याचाच घात केला; कर्ज फेडण्यासाठी सोने व्यापाऱ्याला कारागिराचा ४० लाखांचा गंडा
- ‘खोटारड्यांच्या जागतिक स्पर्धेत मोदींना दरवेळी सुवर्णपदक मिळेल’, काँग्रेसचा हल्लाबोल
- ‘औरंगाबाद ग्रामीणलाही तीन मधून लेव्हल एक मध्ये आणण्यासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवावा’
- गाफीलपणा टाळा…पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत आजही वाढ !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
