Share

एकही पात्र आपदग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, अमित देशमुख यांचा विश्वास

Published On: 

🕒 1 min read

लातूर : जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसानीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यात एकही पात्र आपदग्रस्त शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.

पावसामुळे झालेले हे नुकसान अभूतपूर्व असून येत्या चार ते पाच दिवसात पंचनामे पूर्ण करुन शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंचनामे करताना कोणतीही चूक होणार नाही, विमा कंपन्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. ज्यांच्या घरात पाणी घुसले आहेत, त्या कुटुंबियांना तात्काळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

अतिव़ृष्टीमुळे खराब झालेले रस्ते, पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. तसेच शहरातील रस्ते दुरुस्ती करण्याची मोहिम नगर परिषद आणि महानगर पालिकेने हाती घेण्याच्या सूचना केल्या असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. आपत्तीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्वरत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच जलव्यवस्थापणासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या असल्याचेही देशमुख म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!