मुंबई : 23 सप्टेंबर रोजी पुण्यामध्ये ‘पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया’ या संघटनेवरील छापेमारीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली. अशातच पीएफआय या संघटनेला केंद्र सरकार कडून बेकायदेशीर संघटना घोषित केलं आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही संघटना आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांना हा निर्णय लागू असल्याचं केंद्राने सांगितलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर भाजप पक्षाचे नेते नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नितेश राणे ?
एकच घाव घातला पण जोरदार घाव घातला. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना सलाम, असं म्हणत नितेश राणे यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. यासंदर्भात नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर आकऊंटवरून एक ट्विट केलं आहे.
पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, पीएफआयवर बंदी घालणे ही काळाची गरज होती. आता त्याच धर्तीवर काम करणारी रझा अकादमी ही दहशतवादी संघटना बाकी आहे. सर्वांना मिटवून टाका, हा आमचा हिंदुस्तान आहे.
दरम्यान, पीएफआयची स्थापना करणारे काही सदस्य हे स्टूडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सीमीचे सदस्य असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली असल्याचं समजतं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Kishori Pednekar | “स्वत:च्या बाळाला बाजूला ठेवून दुसऱ्याच्या बाळाला…”; किशोरी पेडणेकरांचा भाजपवर निशाणा
- Shivsena Vs Shinde | सत्ता संघर्षाचा निकाल तब्बल एक महिना लांबला, ‘या’ तारखेला होणार निर्णय
- Bacchu Kadu | “मी कानशिलात लगावली नाही तर…” ; ‘त्या’ VIDEO वर बच्चू कडूंचे स्पष्टीकरण
- Congress । गहलोत, शशी थरुर यांच्यानंतर आता अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये ‘हे’ नाव आहे सर्वात जास्त चर्चेत!
- Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांची मोठी घोषणा, ‘या’ ठिकाणी घेणार दसरा मेळावा


