Share

शहरासह इतर जिल्ह्यातील नऊ बाधितांचा घाटीत मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाबाधितांच्या मृत्यूदरात घाटीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गेल्या चार दिवसात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यावरुन कोरोनाची दाहकता लक्षात येत आहे. दरम्यान, शनिवारी घाटीकडून आलेल्या अहवालात सायंकाळपर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये शहरासह इतर जिल्ह््यातील रुग्णांचा देखील समावेश आहे.

यात जुना जालना, कंचननगरमधील ८१ वर्षीय वृध्देचा १२ मार्च रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास, उस्मानपुरा, पीर बाजारातील ७३ वर्षीय वृध्देचा दुपारी पावणेपाचच्या सुमारास, मयूरपार्कमधील ८५ वर्षीय वृध्दाचा रात्री साडेनऊच्या सुमारास, नूर कॉलनीतील ६० वर्षीय वृध्देचा रात्री पावणेदहाच्या सुमारास, सिडको, एन-९ मधील ६१ वर्षीय वृध्दाचा १३ मार्च रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास, भोईवाडा मिलकॉर्नर येथील ५२ वर्षीय वृध्देचा सकाळी साडेदहाच्या सुमारास,

जालना, कडोली येथील ८५ वर्षीय वृध्देचा सकाळी साडेसातच्या सुमारास, फुलंब्री तालुक्यातील निमखेडा येथील ६२ वर्षीय वृध्देचा दुपारी दीडच्या सुमारास तर खुलताबाद, टपाल कार्यालयाजवळील ६१ वर्षीय वृध्देचा दुपारी दोनच्या सुमारास मृत्यू झाला. सध्या घाटीत २१३ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती गंभीर तर १६१ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तर आतापर्यंत घाटीत १ हजार ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!