Share

‘संज्या राऊतचं थोबाड कधीतरी आपल्या राज्यातला शेतकरी रंगवेल’; निलेश राणेंची शेलक्या भाषेत टीका

Published On: 

सिंधुदुर्ग : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत गेल्या चार दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले आहेत.केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी आंदोलक शेतकरी गाजियाबाद-दिल्ली सीमेवर पोहोचले आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘ ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यास रोखले गेले आहे, असे वाटते कि ते या देशाचे नाहीत. त्यांना दहशतवाद्यांसारखे वागवले गेले आहे. ते शीख असल्यामुळे आणि पंजाब आणि हरियाणाहून आले आहेत, त्यांना खलिस्तानी म्हणतात. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे.’ अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.

संजय राऊत यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी अतिशय बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. ‘ संज्या राऊतला पंजाबच्या शेतकऱ्यांबद्दल बोलायचा अधिकार काय??? महाराष्ट्रात शेतकरी तडफडतोय, जीव देतोय त्याचं ठाकरे सरकारला काही नाही. संज्या राऊत चं थोबाड कधीतरी आपल्या राज्यातला शेतकरी रंगवेल तेव्हा लक्षात येईल ह्या हलकटांना की शेतकऱ्यांच्या विषयावर राजकारण करायचं नसतं.’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!