Share

विद्या बालनने वनमंत्र्यांचे डिनरचे निमंत्रण नाकारल्याने तिच्या चित्रपटाचे शूटिंग थांबवल्याच्या चर्चा !

Published On: 

इंदौर : कोरोनाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर अभिनेत्री विद्या बालन तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने मध्य प्रदेशातील वनमंत्र्यांनी दिलेले डिनरचे निमंत्रण नाकारल्यामुळे तिच्या चित्रपटाचे शूटिंग थांबवल्याच्या चर्चा आहेत. वनमंत्री विजय शाह यांनी आपणच जेवण पुढे ढकलण्याची विनंती केल्याचा दावा केला आहे. मात्र सोशल मीडियावर यावरुन उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. याआधी देखील अभिनेते विजय राज यांना विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने या चित्रपटाचे शूटिंग चर्चेत आलं होतं. तर आता विद्या बालनच्या या प्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याचं बोललं जातं आहे.

अभिनेत्री विद्या बालन सध्या मध्य प्रदेशात ‘शेरनी’ चित्रपटाचं शूटिंग करत आहे. 21 नोव्हेंबरपर्यंत या सिनेमाला चित्रिकरणाची परवानगी मिळाली होती, मात्र काही कारणास्तव त्याला ब्रेक लागला. अशातच मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांच्यासोबत एका कथित वादाची फोडणी याला मिळाली. विजय शाह यांच्यासोबत डिनरचे निमंत्रण विद्या बालनने नाकारल्यामुळे शूटिंगला आडकाठी झाल्याचं बोललं जातं.

विद्या बालन आणि विजय शाह 8 नोव्हेंबरला दुपारी 11 ते 12 वाजताच्या दरम्यान भेटणार होते. मात्र शाह यांनी येईपर्यंत संध्याकाळचे पाच वाजले. विजय शाह शूटिंग स्थळापासून जवळच थांबले होते. तिथेच त्यांच्या रात्रीच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यामुळे विजय शाह यांनी विद्या बालनलाही डिनरसाठी निमंत्रित केल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, विद्या बालन गोंदियामध्ये वास्तव्याला होती. शूटिंगपासून तिची राहण्याची जागा जवळपास 40 किलोमीटर दूर होती. त्यामुळे तिने इतका वेळ डिनरसाठी थांबण्यास नकार दिला. या घटनेला काही दिवस झाल्यानंतर शेरनी टीमच्या क्रूला सेटवर जनरेटर नेण्यास रोखण्यात आलं. नियमांवर बोट ठेवून त्यांची आडकाठी करण्यात आली. डीएफओंनी केलेल्या या कारवाईनंतर मोठा गदारोळ झाला. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर आणि जनरेटरची संख्या कमी केल्यानंतर पुन्हा शूटिंग सुरु झालं.

काही माध्यमांच्या वृत्तानुसार, वनमंत्र्यांसमवेत डिनर न घेतल्यावरुन निर्माण झालेल्या नाराजीमुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याचं बोललं जातं. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनीही ही गोष्ट लज्जास्पद असल्याची टीका केली. मात्र या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचा दावा शेरनी चित्रपटाचे दिग्दर्शक सय्यद अली आणि विजय शाह यांनी केला.

या दोन्ही घटना स्वतंत्र आहेत. नियम मोडल्यामुळेच शूटिंगला परवानगी मिळाली नाही. मध्य प्रदेश हे शूटिंग हब होत असताना प्रतिमा मलीन करण्याचा डाव चुकीचा आहे, असं सय्यद अली म्हणाले. “शूटसाठी परवानगी घेणाऱ्यांच्या विनंतीवरुन मी तिथे (बालाघाट) गेलो होतो. त्यांनी मला दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाची विनंती केली. मात्र मला आता शक्य नाही, मी महाराष्ट्रात गेल्यावर त्यांना भेटेन, असं मी सांगितलं. डिनर रद्द झाले, शूट नाही” असं स्पष्टीकरण विजय शाह यांनी दिलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!