Share

Nilesh Rane । “केसरकर, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी!”, निलेश राणेंचा पलटवार

Published On: 

Nilesh Rane । मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील आमदार आणि प्रवक्ते दीपक केसरकर हे अनेक गौप्यस्फोट करत आहेत. केसरकर यांनी काल केलेल्या एका वक्तव्यामुळे आता त्यांच्यावर टीका होण्यास सुरवात झाली आहे. केंद्रय मंत्री नारायण राणेंच्या कुटुंबाकडून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न झाला, असं गंभीर वक्तव्य केसरकर यांनी केलं होत. त्यानंतर आता नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी दीपक केसरकर यांना प्रत्युत्तर देत त्यांची खिल्ली उडवली आहे.

यानंतर आता राणे-केसरकर हा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत केसरकारांवर निशाणा साधलाय. निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, 1 तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे!, असं ट्विट करत निलेश राणेंनी केसरकरांवर शाब्दिक हल्ला केलाय.

दरम्यान, याआधी राणे यांचे कट्टर समर्थक आणि भाजप नेते राजन तेली यांनी देखील केसरकारांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि नव्या निर्णयांमुळे राज्यातील जनता खुश आहे. दीपक केसरकरांनी उगाच भाजप नेत्यांनी काय करावं, असे सल्ले देऊ नये. मुख्यमंत्री साहेबांनी दीपक केसरकरांना आवरावं, असं राजन तेली म्हणाले आहेत. दीपक केसरकरांनी आपल्या मतदार संघात काय सुरु आहे, याकडे लक्ष द्यावे. महाराष्ट्रात एवढ्या चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. आतापर्यंत जे निर्णय ठाकरे सरकारने घेतले नाहीत, एवढे ऐतिहासिक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतले आहेत. त्यामुळे आज केसरकर वेगळ्या दिशेने वातावरण घेऊन जात आहेत. त्यांना थांबवण्याची गरज आहे. त्यांनी भाजपच्या कोणत्याही नेतृत्वार बोलू नये, अशी विनंती आहे.

नेमकं काय म्हणाले होते केसरकर ?

उद्धव साहेबांची आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली आणि जे काही मला उद्धवसाहेबांच्या आणि पंतप्रधान मोदींच्या बोलण्यातून समजत होतं की, खऱ्या अर्थाने कुटुंबप्रमुख कसा असावा, हे पंतप्रधान महोदयांनी त्याठिकाणी दाखवून दिलं. तर मोदींशी संबंध जपण्यास ठाकरेंनी तयारी दाखवली होती. 12 आमदारांचं निलंबन झालं तेव्हा भाजपसोबत बोलणी सुरु होती. नारायण राणेंचा त्याचवेळी केंद्रात समावेश झाला. राणे केंद्रात गेल्याचं ठाकरेंना आवडलं नाही आणि बोलणी रखडली, असं केसरकर म्हणाले होते.

तसेच आदित्य ठाकरेंबद्दल जे बोललं जात आणि वस्तुस्थिती यामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. ही वस्तुस्थिती आहे की सुशातसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये नारायण राणे यांचा मोठा वाटा होता. ठाकरे कुटुंबियांवर आमच्यासारखे लोक जे प्रेम करतात ते यामुळं दुखावले गेले होते. भाजपच्या अनेक ज्य़ेष्ठ नेत्यांचे माझे जवळचे संबंध आहेत. त्यामुळं मी त्यांना विचारलं होतं की, तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही कसा वापरु देता. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की, आमच्या बहुतांश आमदारांचा अशा प्रकारच्या बदनामीला विरोध आहे, असंही ते म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!