Share

कोरोना योद्ध्यांची घाटी प्रशासनाकडून हेळसांड; कत्रांटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून स्वत:चे कर्तव्य बजावणाऱ्या औरंगाबाद घाटी येथील कत्रांटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अधिच तुटपुंजे वेतन तेही वेळेवर मिळत नसल्याने मागील ११० दिवसापासून कत्रांटी कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. वेळेवर न मिळणाऱ्या वेतनामुळे कर्मचाऱ्यात अंसतोष पसरला आहे.

घाटीतील कत्रांटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत करावे अशी मागणी घेऊन महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकने पुढाकार घेतला आहे. घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या कत्रांटी कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडले. या कोरोना योद्धांनी दिवस-रात्र रुग्णांची सेवा केली. तरीही कर्मचाऱ्यांना अतिशय तुटपुंजे वेतन मिळते आहे. त्यातही फेब्रुवारी महिना संपला असून जानेवारीचे वेतन मिळाले नाही. कत्रांटी कर्मचाऱ्यांचे वेळेवर वेतन न मिळाल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यामुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

सदर कत्रांटी कर्मचारी ११० दिवसांपासून अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांच्या दालनासमोर उपोषणावर आहेत. येत्या दोन दिवसांत जर पगार आणि बोनस मिळाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर अभय टाकसाळ, विकास गायकवाड, किरण पंडित, भालचंद्र चौधरी, गजानन खंदारे व इतर कत्रांटी कर्मचारी आदींच्या साह्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!