Share

‘पुनावालांच्या आरोपांवर खरं-खोटं तपासण्याची गरज’, जितेंद्र आव्हाडांची मागणी

Published On: 

मुंबई : सध्या सीरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी ‘द टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल. आपल्या देशातील श्रीमंत आणि मोठ्या मोठ्या राजकीय हस्थींकडून त्यांना या धमक्या येत आहेत. आणि यामुळे ते कोरोना लशीचे उत्पादन लंडन मध्ये करण्याच्या तयारीत आहेत, असं म्हटलं जात आहे.

यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘अदर पुनावाला यांनी लंडनधल्या ‘द टाईम्स’ला मुलाखत दिली आहे. त्यामुळे खरं-खोटं तपासण्याची गरज आहे. भारतात कोरोना प्रतिबंधक लसींच उत्पादन करणारा अदर पुनावाला लंडनला का निघून गेला? ते भारतातल्या प्रत्येक नागरीकाला कळायलाच हवं. ज्या अर्थी तो म्हणतोय की, शीर कापलं जाईल, त्या अर्थी प्रकरण गंभीर आहे, याचा शोध घेतला पाहिजे’ असे आव्हाड म्हणाले.

या राज्यातला मंत्रालयातला शिपाई का असेना, त्याला जगण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याचा तो मुलभूत अधिकार आहे. त्यावर कोणी गदा आणत असेल, तर योग्य कारवाई होईल. आजच्या घडीला भारतातला सर्वात महत्त्वाचा व्यक्ती कोण असेल, तर तो अदर पूनावाला आहे. कोट्यवधी लोकांचे जीव त्याच्या हातात आहेत. तो लसींचे उत्पादन पुण्यातून लंडनला हलवणार असेल तरी ती नामुष्की आहे’ असे जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!