मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची भायखळा कारागृहातून ५ मे रोजी सुटका झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यासोबत आमदार रवी राणाही होते. कारागृहातून सुटका झाल्यानंतर प्रकृती बरी नसल्याने नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रुग्णालयातून आज (८ मे) डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर नवनीत राणा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना नवनीत राणा म्हणाल्या की,‘मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा. महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा निवडा, तुमच्यासमोर एक महिला उभी राहून लढून दाखवेल.’ तसेच रामाच्या आणि हनुमानाच्या नावावर सरकारने ज्याप्रकारे माझ्यावर अत्याचार केला त्याचे उत्तर महाराष्ट्राची जनता यांना नक्की देईल, असेही राणा म्हणाल्या.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी नवनीत राणा यांची काल (७ मे) रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. तद्पश्चात यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की,‘नवनीत राणा यांची तब्येत स्थिर होत आहे. मात्र, ज्याप्रकारे त्यांना वागणूक देण्यात आली ती अतिशय गंभीर आहे. गुन्हेगारांनाही जी वागणूक दिली जात नाही तशाप्रकारची वागणूक त्यांना देण्यात आली आहे. या सरकारने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत.’
महत्वाच्या बातम्या:
- “…मग त्यांनी चुली पेटवायच्या का?”, महेश तपासे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
- VIDEO : आता फक्त मोजत राहायचं..! पाकिस्तानच्या आफ्रिदीला षटकार खेचत चेतेश्वर पुजारानं ठोकलं सलग चौथं शतक
- “१४ तारखेला शनिवार येतो, कुटुंबाला घेऊन…”, निलेश राणे यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना जोरदार टोला
- IPL 2022 : आयपीएलची मागची बाजू काळी? ख्रिस गेलचा गौप्यस्फोट! म्हणाला, “…म्हणून मी सोडलं”
- “उद्धव ठाकरे एका महिलेला घाबरले, त्यामुळं त्यांनी…”; रवी राणांचा आरोप


