Share

“१४ तारखेला शनिवार येतो, कुटुंबाला घेऊन…”, निलेश राणे यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना जोरदार टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील काहीदिवसांपासून राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना १४ मे ला जाहीर सभा घेवून विरोधकांचा समाचार घेणार आहे. मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमात याविषयी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की,’गेले काही दिवस आपण माणसातच आहोत. आज मास्क काढला, पण तसा मास्क काढायचा आहे तो १४ तारखेला काढीन.’ दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभुमीवर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे.

यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘१४ तारखेला मुख्यमंत्र्यांची सभा असून त्यांना त्यांच्या मनातलं बोलायचंय. ‘टोमणे कट्टा’ एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. त्यांच्या टीमने तयार राहावं कारण दोन वर्षे टिकेल एवढं मुख्यमंत्री त्यांना मटेरियल देतील. १४ तारखेला शनिवार येतो, कुटुंबाला घेऊन फिरायला जा, काही करा पण ‘UT series’ नको’, अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.

https://twitter.com/meNeeleshNRane/status/1523165797337550849?s=20&t=bGoCxfNeIbwm55WD9saYZA

दरम्यान, ‘१४ तारखेला माझ्या मनात आहे ते मी बोलणार.’ तसेच निवडणुका आल्या की थापांचा पूर येतो. राजकारण जरूर करा पण त्यात एक दर्जा असला पाहिजे. नुसता विरोध करणे म्हणजे विरोधी नाही, असेही मुख्यमंत्री मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमात बोलत असतांना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!