Share

नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचं सरकार बरखास्त करावं; नाना पटोलेंची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना लखीमपूर येथे जाण्यापासून उत्तर प्रदेशातील पोलिसांनी रोखलं आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात तालिबानी राज सुरू आहे. पीडित कुटुंबांना भेटणं भाजपच्या राज्यात गुन्हा आहे का?; असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला आहे. तसेच प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचाही नाना पटोले यांनी निषेध केला.

नरेंद्र मोदींचं आणि उत्तर प्रदेशचं सरकार बरखास्त करावं. शेतकरी आज या देशाचा मूळ असताना या शेतकऱ्यांची विटंबना करण्याचा अधिकार या भाजपच्या विचाराला दिला गेलेला नाही. या मूळाला संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला असेल तर निश्चितपण केंद्रातील आणि उत्तर प्रदेशमधील सरकार बरखास्त करण्याची मागणी काँग्रेसकडून केली जाणार, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारमधील गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या कारने शेतकऱ्यांना चिरडले. मंत्र्यांच्या मुलावर कारवाई करण्याऐवजी त्याला वाचवण्यासाठी अजयसिंह बिष्ट यांचे सरकार आटापिटा करत आहे.  झालेल्या घटनेचा निषेझ करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी काँग्रेसकडून शेतकऱ्यांबरोबर आंदोलन करण्याच्या सूचना काँग्रेस कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. या कारवाया तातडीने झाल्या नाही तर वेळप्रसंगी महाराष्ट्र बंदची हाकही आम्ही देऊ, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!