Share

युपीला भेट देण्यासाठी आता व्हिसाची गरज आहे काय? ‘त्या’ घटनेवरून भूपेश बघेलांचा संतप्त सवाल

Published On: 

छत्तीसगड: उत्तर प्रदेश येथील लखीमपूर खेरी या ठिकाणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने काल आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडले. याठिकाणी प्रशासनाने 144 कलम लागू केलं आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांना येथे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यावरूनच आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.

लोकांना लखीमपूर खेरीला जाण्यापासून का रोखले जात आहे? लखीमपूर खेरीमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे मग लखनौमध्ये कोणाला उतरण्याची परवानगी का नाही? यूपीमध्ये यापुढे लोकांना अधिकार नाहीत का? यूपीला भेट देण्यासाठी आता व्हिसाची आवश्यकता आहे काय? असा संतप्त सवाल छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला आहे.

या घटनेवरून आता देशभर संताप व्यक्त केला जात आहे. याठिकाणी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावरूनही कॉंग्रेसने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतांवर अंतिम संस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!