Share

‘जीता किसान हारा अभिमान, आंदोलनजीवी म्हणत शेतकऱ्यांना हिणवणाऱ्या मोदींनी माफी मागावी’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील गेल्या दीड वर्षापासून ज्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांमुळे (Farm Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते ते तीन कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांनी आज सकाळी ९ वाजता मागे घेतले असल्याची घोषणा केली. दीड वर्षांपासून दिल्लीच्या सीमेवर कशाचीच पर्वा न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. तसेच कृषी कायदे मागे घेत मोदींनी देशाची माफीही मागितली आहे.

या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपले सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही, असं म्हणत त्यांनी देशाची क्षमा मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली. मोदी यांनी केलेल्या या घोषणे नंतर विरोधकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

यावरच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यांनी ट्विट करत अखेर शेतकऱ्यांचा विजय झाला असे म्हंटले आहे. नाना  पाटोले ट्विट करत म्हणाले, ‘पाच राज्यातील निवडणुकीवर डाेळा ठेऊन हा कायदा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना व देशातील जनतेलाला मोदीजींनी सांगितले पाहीजे की परत असे कायदे देशात आणणार नाही, तसेच देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे.

शेतकरीविरोधी तीन काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींनी ‘आंदोलनजीवी’ म्हणत हिणवलं होतं. आज काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा अहंकारी मोदी सरकारला करावी लागली. हा ‘आंदोलनजीवी शेतकऱ्यांचा’ विजय! असल्याचं म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!