मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तीन कृषी कायदे (Farm Laws) मागे घेतले असल्याची माहिती दिली आहे. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधित करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. त्यात नुकतीच त्यांनी तीन कायदे मागे घेतल्याची घोषणा केली तसेच देशाची माफी देखील मागितली आहे.
या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही, असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली आहे. आता या निर्णयावरच काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोरोना महामारी सुरू असताना काळे कृषी कायदे अध्यादेशाद्वारे लादले गेले होते, आता ते रद्द करतानादेखील तात्काळ अध्यादेश काढून रद्द करावेत. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर या अध्यादेशांना मान्यता घेण्यात यावी. #FarmLaws #Farmlawsrepealed
— Prithviraj Chavan (@prithvrj) November 19, 2021
पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी ट्विट करत लिहिले की, ‘काळे कृषी कायदे मागे घेणे हा शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक विजय आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकामुळेच हा निर्णय घेतला. पण या आंदोलनात ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला, याला जबाबदार कोण? तसेच अन्नदात्यांना देशद्रोही, खालिस्तानी म्हणल्याबद्दल मोदींनी माफी मागावी,’ असे म्हणत नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘हे’ दुःखद, लज्जास्पद, पूर्णपणे अन्यायकारक; केंद्र सराकराच्या निर्णयावर कंगना नाराज
- ‘त्या गोष्टीवर काम करायला हवे’; गौतम गंभीरने सांगितली सूर्यकुमारची मोठी कमजोरी
- ‘देर आये दुरुस्त आये’, मोदींच्या ‘या’ निर्णयावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
- कपिल देव यांनी रोटेशन पॉलिसीवर उपस्थित केले प्रश्न; म्हणाले…
- ‘मोडेन पण वाकणार नाही’; कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया


