🕒 1 min read
मुंबई : शेतकरीविरोधी तीन काळे कृषी कायदे व वीज क्षेत्राचे खासगीकरण विधेयक रद्द करावे. इंधनाचे दर कमी करून त्या जीएसटीच्या कक्षेत आणावे. स्वामीनाथन समितीच्या शिफारसीनुसार सर्व शेतीमालाला आधारभूत किमती व सरकारी खरेदीची हमी देणारा कायदा करावा, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (दि. २७) संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या वतीने भारत बंदची घोषणा केली आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी याला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने संपूर्ण पाठीमाबा दर्शवला होता. तर आता कॉंग्रेस पक्षाने देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘शेतकरीविरोधी काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात उद्या २७ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या बंदला काँग्रेस पक्षाचा सक्रिय पाठिंबा असून मी स्वतः अकोल्याहून या बंदमध्ये सहभागी होणार आहे. हा बंद शेतकरी, कामगार, सर्वसामान्यांचा हक्क मारणाऱ्या मोदी सरकार विरोधात असणार आहे’ असे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडले आहे.
तसेच कृषी कायदे बनवत असताना शेतकरी-कामगार यांचा सहभाग यामध्ये कसा होणार नाही याची पुरेपूर काळजी मोदी सरकारने घेतली आहे. जिथे आंदोलन सुरु आहे तिथून २५ किलोमीटरवर भिंत आणि खिळे लावण्याचं काम सरकारने केलं, जेणेकरुन मीडिया, पत्रकारांना त्यांच्यापर्यंत पोहचू येणार नाही. अश दडपशाही मोदी सरकारने केली आहे. असा घणाघात देखील नाना पटोले यांनी केली मोदी सरकारवर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपला कुठलाही धक्का नाही, गेलेले नगरसेवक खडसे समर्थक- गिरीश महाजन
- आमदारकीचा माज घरी दाखवा सुनिल कांबळे; महिला अधिकारी शिवीगाळ प्रकरणी चाकणकर आक्रमक
- इमरान हाश्मी साकारणार आणखीन एका हॉरर चित्रपटात मुख्य भूमिका
- ‘…तर सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?; आठवलेंचा सवाल
- हिम्मत असेल तर आता माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा-सोमय्यांचे आव्हान

