Share

दिड लाख लसींची मागणी असतांना २५ हजारांवर पालिकेची बोळवण!

Published On: 

औरंगाबाद : अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे शनिवारी शहरातील आठ केंद्रावर दुपारपर्यंत लसीकरण सुरु होते. शहरातील इतर केंद्रांवर दोन दिवस लसीकरण बंद होते. दरम्यान, शासनाकडून महापालिकेला २५ हजार लसींचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे सोमवारी (दि.२६) शहरातील सर्व केंद्रावर लसीकरण सुरु झाले असून नागरिकांनी सकाळपासूनच लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी रांगा लावल्याचे पाहायला मिळाले. मात्र मनपा प्रशासनाने दिड लाख लसींची मागणी केलेली असतांना शासनाने केवळ २५ हजारांवर औरंगाबाद पालिकेची बोळवण केली आहे.

लसींचा पुरवठा सोमवार पर्यंत होईल, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली होती. दरम्यान, शासनाकडून महापालिकेला २५ हजार लसींचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील सर्व केंद्रावर लसीकरण सुरु झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जम्बो लसीकरण मोहिम राबविण्याचे पालिकेने ठरवले आहे.

त्यानुसार पालिकेच्या वतीने शहरात सर्व ११५ वाॅर्डांमध्ये ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या लसीकरण मोहिमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण मोहीम थांबेल, अशी शक्यता वाटत होती. या अनुषंगाने पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार पालिकेने शासनाकडे दिड लाख कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसींची मागणी केली होती. शासनाकडून पालिकेला रविवारी २५ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. मात्र हा साठा संपण्याच्या पूर्वी नवीन लसी मिळतात का हे पाहावे लागेल अन्यथा लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे पुन्हा एकदा ही मोहीम संकटात सापडू शकते.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!