Share

मुंबईची बातच न्यारी; ‘असा’ घेतला आयपीएल स्पर्धेचा निरोप

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली.

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धा मध्येच स्थगित करण्याची नामुष्की ओढावली आहे. स्पर्धा रद्द झाल्यानंतर अनेक खेळाडू आणि संघानी हटके ट्विट करत स्पर्धेचा निरोप घेतला. यात मुंबई इंडियन्सने हटके स्टाईलमध्ये मराठीत ट्विट करत स्पर्धेचा निरोप घेतला आहे. मुंबई इंडियन्सने ‘पलटन, आम्ही जिंकलो किंवा हरलो…तुमचा सपोर्ट नेहमी आपल्या टीम बरोबर होता! त्यासाठी मनापासून आभार ????’असे मराठीत ट्विट करत स्पर्धेचा निरोप घेतला आहे.

कोरोनाच्या काळात क्रिकेट रसीकांना विरंगुळ्याचा क्षण म्हणून आयपीएल स्पर्धेला बघीतले जाते. स्पर्धा रद्द झाल्याने अनेक क्रिकेट रसिकांचाही हिरमोड झाला आहे. आयपीएल स्पर्धा म्हणजे क्रिकेटचा कुंभमेळा समजला जातो. त्यात मुंबई इंडियन्सला महाराष्ट्राचा संघ म्हणून मानले जाते. स्पर्धेत चेन्नईचा धुव्वा उडवल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी चांगलाच जल्लोष केला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!