मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताकडून इशान किशन आणि सुर्यकुमार यादव यांनी अतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात इशान किशनने सलामीला येत धडाकेबाज अर्धशतक केले आणि आपली निवड सार्थ ठरवली. मात्र सुर्यकुमार यादवला या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.
सूर्यकुमारला दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाची कॅप देऊन सन्मानित करण्यात आलं. सूर्याने ट्विटमध्ये आपल्या कुटुंबियांचे आभार मानले.“माझे आई वडील, ताई, बायको, प्रशिक्षक आणि इतर सहकाऱ्यांच्या मेहनतीचं फल आहे. या क्षणासाठी आम्ही सर्वांनी वाट पाहिली. आमचं सर्वाचं एकत्र स्वप्न पूर्ण झालं”, असं सूर्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे.
This one is for my mom, dad, sister, my wife, my coach and all my well wishers.
We dreamt together – we waited together – we full filled together ???????? pic.twitter.com/we0lAzqPve
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) March 14, 2021
मंगळवारी होणाऱ्या सामन्यात सुर्यकुमार यादवला फलंदाजी करायला मिळते का हा त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सूर्यकुमारला अष्टपैलू अक्षर पटेलच्या जागी संघात स्थान दिले आहे. त्यामुळे त्याला मधल्या फळीत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर नंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
- तिसऱ्या टी-२० सामन्यात सुर्यकुमारसाठी कोहली बलीदान करेल का?
- आज भारत-इंग्लंड तिसरा टी-20 सामना ; नव्या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा
- आज इंग्लंडविरुद्ध तिसरी लढत रंगणार ; हिटमॅन रोहित शर्माचं पुनरागमन
- ‘एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री व देशाच्या पंतप्रधानांकडे घेऊन जाच’
- ‘मोठे शौर्य गाजविले या भ्रमात त्या कानडी संघटनांनी राहू नये’


