🕒 1 min read
अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताकडून इशान किशन आणि सुर्यकुमार यादव यांनी अतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात इशान किशनने सलामीला येत धडाकेबाज अर्धशतक केले आणि आपली निवड सार्थ ठरवली. मात्र सुर्यकुमार यादवला या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.
मंगळवारी होणाऱ्या सामन्यात सुर्यकुमार यादवला फलंदाजी करायला मिळते का हा त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सूर्यकुमारला अष्टपैलू अक्षर पटेलच्या जागी संघात स्थान दिले आहे. त्यामुळे त्याला मधल्या फळीत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर नंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली होती.
मात्र त्याला फंलदाजी करायला संधी न मिळाल्यामुळे कर्णधार कोहली फलंदाजी क्रमवारीत बदल करुन सुर्यकुमार यादवसाठी बलिदान देईल का असा प्रश्न क्रिकेटरसीकांना पडला आहे. आयपीएल मध्ये मुंबई इंडीयन्स कडून सुर्यकुमार सहसा तिसऱ्या क्रमांकावर फलदांजी करत असतो. या क्रमांकावर फलंदाजी करत सुर्यकुमारने मुंबई इंडीयन्सला अनेकदा विजय मिळवून दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेवटच्या तीन टी-२० सामन्यात मैदानात प्रेक्षकांना प्रवेश नाही
- जिल्ह्यात 51689 कोरोनामुक्त तर 5796 रुग्णांवर उपचार सुरू ; आज 1128 रुग्णांची भर
- पियूष गोयल साहेब तुम्ही महाराष्ट्राचे, मराठवाड्यावर अन्याय का? : खासदार इम्तियाज जलील
- दुचाकी चालकावर फांदी पडल्याने चालक जखमी
- म्हणून उद्योग बंद करण्याची गरज नाही – जिल्हाधिकारी चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
