🕒 1 min read
अहमदाबाद : भारत-इंग्लंडदरम्यानची टी-20 क्रिकेट मालिका म्हणजे टी-20 क्रिकेट विश्वचषकासाठी संघाची मोर्चेबांधणी सुरू असल्याने नव्या दमाचे खेळाडू स्वतःला सिद्ध करण्यासाठी आतूर आहेत. इशान किशनने पदार्पणाच्या लढतीत अर्धशतक ठोकून ती झलक दाखवली आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना मंगळवारी रंगणार आहे. त्यामुळे इशानसह सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर कशी कामगिरी करणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा आहेत.
दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लड संघादरम्यान पाच टी-२० सामन्याची मालिका अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी या मैदानावर होत आहे. सद्यस्थितीत आतापर्यंत झालेल्या सामन्यात प्रेक्षकांना ५० टक्के क्षमतेने प्रवेश दिला जात आहे. मात्र कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव पाहता उर्वरित सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. सोमवारी संध्याकाळी बीसीसीआयने या संदर्भात टि्वट करुन एक पत्रक जाहीर केले आहे.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांडय़ा, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, दीपक चाहर, राहुल तेवतिया, इशान किशन.
महत्वाच्या बातम्या
- जिल्ह्यात 51689 कोरोनामुक्त तर 5796 रुग्णांवर उपचार सुरू ; आज 1128 रुग्णांची भर
- पियूष गोयल साहेब तुम्ही महाराष्ट्राचे, मराठवाड्यावर अन्याय का? : खासदार इम्तियाज जलील
- दुचाकी चालकावर फांदी पडल्याने चालक जखमी
- म्हणून उद्योग बंद करण्याची गरज नाही – जिल्हाधिकारी चव्हाण
- जालना : लॉकडाऊनचा निर्णय गुरुवारी; हॉटेल्स, खाद्यपदार्थ पदार्थांची दुकाने बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
