Share

मुंबई महानगरपालिका प्रभागरचनेत बदल, आता २२७ ऐवजी…

Published On: 

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ ८ मार्च २०२२ रोजी संपणार आहे. यामुळे मुंबई महानगरपालिका नगरसेवकांना कार्यकाळाची मुदतवाढ देणार की, पुढील कालावधीसाठी प्रशासन नियुक्त करणार, यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुका २०११ च्या जनगणनेनुसार होत असल्या तरी लोकसंख्यावढीमुळे प्रभागांची संख्या ९ ने वाढविण्यात आली आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार लोकांच्या कामाची परिणामकारक दखल घेण्यासाठी ही नवीन प्रभागरचना केली असल्याचे सांगितले जाते. मुंबई शहर विभागात ३, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ३ असे एकूण ९ प्रभाग वाढविण्यात आले आहेत. ९ वाढीव प्रभागांसह पालिका १ फेब्रुवारीला प्रभागांच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणार आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी  दिला गेला आहे.

राखीव जागांबाबत महत्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आला आहे. २०२२ मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महिलांना ११८ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यात एससीसाठी ८, एसटीसाठी १ आणि इतर १०९ जागा साधारण गटातील महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ओबीसी आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने तूर्तास ओबीसींना खुल्या प्रवर्गात समावेश दिला गेला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!