Share

“…तुमच्या शापाने कावळाही मरणार नाही”, राऊतांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सामने बघायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी काहीही झाले तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा केला. तद्पश्चात आता राऊत यांच्या या टीकेवर भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तसेच तुमच्या शापाने कावळाही मरणार नाही’, असा खोचक टोला भातखळकरांनी राऊतांना लगावला आहे.

दरम्यान, भाजपने स्वत:च अंधाऱ्या विहिरीत उडी मारली असून त्यांचा पक्ष जागतिक स्तरावरचा पक्ष आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल. परंतु काहीही झाले तरी महाराष्ट्रात त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही. तसेच पुढे जवळपास २५-३० वर्ष महाराष्ट्रात त्यांची सत्ता येणार नाही आणि तोपर्यंत भाजप राहिल की नाही माहीत नाही, असे राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!