Share

‘चंद्रकांत पाटलांना शोक असेल तर शोक सभा घेऊ’

Published On: 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा शुक्रवारी केली आणि त्यानंतर देशभरात विरोधी पक्षांनी आनंदोत्सव साजरा केला. शेतकऱ्यांच्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला अखेर यश आले. मात्र अजूनही आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी स्पष्ट केलं आहे. कृषी कायदे मागे घेतल्यानंतर मात्र भाजपच्या अनेक नेत्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.

भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार असल्याची खंत व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या व्यक्तव्यवरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, माझा शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेल. त्यांच्यासाठी हा शोक असेल तर त्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. त्याच सोबत संजय राऊत यांनी भाजपवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांना मालक नव्हे तर गुलाम करण्याचा हा कायदा होता, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!