बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर(Ravikant Tupkar) यांनी कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली असून आज(२० नोव्हें.) या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. परंतु, काल तुपकर यांची प्रकृती खालावल्याने आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. तुपकरांची प्रकृती बघून आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत आंदोलनाला पाठिंबा दिला,पोलिसांच्या गाडीच्या काचाही यावेळी फोडण्यात आल्या. फक्त एवढेच नाही तर यावेळी एका संतप्त कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यानंतर तुपकरांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना रविकांत तुपकर यांच्या आई म्हणाल्या की, ‘माझा मुलगा शेतकऱ्यांसाठी लढतोय. शेवटी शेतकऱ्यांचा मुलगा आहे तो. गुंडगिरी नाही करत. आम्ही कोणता गुन्हा नाही केला. आम्ही स्वतः शेतकरी आहोत. सर्व शेतकऱ्यांसाठी त्यानं आंदोलन केलंय. तो त्याच्या मालाला तो भाव मागतो. सर्व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तो स्वतःचा जीव त्याग करण्यासाठीही तयार आहे. याची दखल सरकारनं घ्यायला पाहिजे. त्याच्या जीवाला काही बरंवाईट झालं तर त्याला फक्त आणि फक्त सरकारच जबाबदार असेल.’
दरम्यान, मागील चार दिवसांपासून सुरु असलेलय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कापूस, सोयाबीन आंदोलनाला आता वाढता पाठिंबा बघायला मिळत आहे. तसेच तुपकरांची तब्येत ढासळत असल्याने कार्यकर्त्यांची आता चिंता वाढू लागली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला- सोनिया गांधी
- कृषी कायदे मागे घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी मानले ‘या’ गायिकेचे आभार
- व्वा! काय हा ‘मास्टर स्ट्रोक’, कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शिवसेनेचा हल्लाबोल
- प्रत्येक चुकीच्या आणि दडपशाहीच्या विरोधात जनतेला एकजुटीने उभे राहावे लागेल- संजय राऊत
- रत्नागिरीत रोजंदारीवर काम करणाऱ्या ८६ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

