Share

घरातील अन्नधान्य भिजलंय खायचं काय ? शेतकरी महिलेचा संभाजीराजेंना सवाल

Published On: 

🕒 1 min read

तुळजापूर –घरातील अन्नधान्य भिजलंय खायचं काय ?द्राक्षबागा भुईसपाट झाल्या ,कांदाचा रेंदा झाला ,आता करायचं काय ! जमिनी खंगाळुन गेल्या जगायचे कसे? हे आणि असे कित्येक प्रश्न सध्या अतिवृष्टी झालेल्या भागातील नागरिकांच्या समोर आहेत. हे सर्व प्रश्न अतिवृष्टी  बाधीत एका महिलेने खा.संभाजीराजेंच्या समोर उपस्थित केले. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या  झालेल्या नुकसानची पाहणीसाठी  संभाजी राजे आले असता महिला शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या.

यावेळी संभाजी राजेनी थेट नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जावुन अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान पाहणी केली.
यात आपसिंगा येथे तर शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता तिथे दीड कीलोमीटर टँक्टर मधुन नंतर चिखलातुन शेतात जावून नुकसान पाहणी केली.

पाहणी नंतर बोलताना छञपती संभाजी राजे म्हणाले की, तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन यात छञपती संस्थानचा जमिनीनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. छञपतींना नुकसान भरपाई नको पण उर्वरीत शेतकऱ्यांच्या नुकसान चे तात्काळ पंचनामे करा असे सांगुन मदत बाबतीत मी केंद्राला बोलतो. गोरगरीब शेतकऱ्यांना माञ मदत गरजेची असल्याने हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीची मागणी मी शासनाकडे करणार असल्याचे छञपती संभाजी राजे यांनी तुळजापूर तलुक्यातील आपसिंगा काञी कामठा सिंदफळ तामलवाडी येथे अतिवृष्टी ने झालेल्या नुकसान ची पाहणी नंतर स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!