Share

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा मृत्यू विरोधकांच्या मारक शक्तीमुळेचं झाला, साध्वी पुन्हा बरळली

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेत्या आणि भोपाळच्या खा. साध्वी प्रज्ञासिंह पुन्हा एकदा बरळल्या आहेत. विरोधकांच्या वाईट शक्तीच्या प्रयोगामुळेचं भाजपचे तीन ज्येष्ठ नेते दगावले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर या वाईट शक्तीच्या प्रयोगाबाबत मला एका महाराजांनी सांगितल होत असं देखील म्हणाल्या आहेत. भोपाळच्या प्रदेश भाजप कार्यालयात सोमवारी माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि एमपीचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांच्या निधनामुळे शोकसभा ठेवण्यात आली होती. यावेळी खा. साध्वी बोलत होत्या.

यावेळी साध्वी म्हणाल्या की, जेव्हा मी लोकसभा निवडणूक लढवत होते. तेव्हा मला एक महाराज भेटले. ‘विरोधीपक्षातील नेते तुमच्या पक्षातील नेत्यांवर वाईट शक्तिचा प्रयोग करत आहेत. त्यामुळे तुम्ही सावध रहा. हा निर्वाणीचा इशारा मला महाराजांनी दिला आणि त्यानंतर मी मधल्या काळात तो विसरलेही. मात्र आज मला महाराजांनी सांगितलेली गोष्ट लख्ख आठवली. तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ पण महाराजांनी सांगितलेलं आज खरं होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान काही महिनाच्या अंतरावरचं भाजपने दोन ज्येष्ठ नेत्यांना गमावले आहे. आधी सुषमा स्वराज आणि आता अरुण जेटली यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे भाजपला धक्का बसला आहे. हे दोन्ही नेते भाजपच्या जडणघडणीच्या काळापासून पक्षाशी जोडलेले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू भाजप नेत्यांना अनपेक्षित होता. मात्र यावर खा. साध्वी यांनी मुक्ताफळे उधळी आहेत. या दोन नेत्यांच्या मृत्यूला विरोधकचं जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!