पुणे : बीड जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांत दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एका जिल्ह्यात इतकी संख्या असेल तर राज्यात किती?, मात्र राज्य सरकारला याचे गांभीर्य नाही. केवळ आर्यन खानला वाचविण्यातच त्यांना रस आहे, अशी घणाघाती टीका शिवसंग्रामचे नेते आ. विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. ते पुण्यात बोलत होते.
पुढे बोलताना मेटे म्हणाले, राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामेदेखील यांनी गांभीर्याने केले नाहीत. त्यामुळे केवळ चार ते पाच हजारांची मदत देऊन हे सरकार शेतकऱ्यांची दिवाळी काळी करत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सुटले नाहीत तर दिवाळीनंतर लगेचच बीड जिल्ह्यात शिवसंग्रामच्या वतीने पहिला शेतकरी मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही मेटेंनी यावेळी दिला.
मराठा आरक्षणा बाबतीत वेळोवेळी शब्द देऊनही सरकार चालढकलपणा करत आहे. न्यायालयीन बाबतीत अक्षम्य दिरंगाई केली जात आहे. मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती देणे, अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी पुरवणे, जिल्हावार वसतीगृह तसेच सारथी संस्थेतून देखील न्याय देऊ शकलेले नाही, असेही मेटेंनी यावेळी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदी अचानक नवाज मियाँना भेटतात, पोप महाराजांनाही भेटतात, दुसरे कोणी केलं असतं तर..’
- न्यूझीलंडचा भारतावर ८ गड्यांनी विजय; भारताचा लाजिरवाणा पराभव
- इंग्लंडचे उपांत्य फेरीमधील स्थान होऊ शकते निश्चित; श्रीलंकेवर विजय आवश्यक
- भारत सेमी फायनलमध्ये पोहचेल? असं ठरू शकतं गणित
- पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का?; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

