Share

पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का?; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल

Published On: 

बुलढाणा : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचा वाद काही नवा नाही. संधी मिळेल तेव्हा राणे आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर सडकून टीका करत असतात. नुकत्याच पार पडलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एका मंचावर आले तरीही त्यांनी एकमेकांना लक्ष्य करणं सोडलं नाही. दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर हा वाद सुरुच आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांकडे आणि पूरग्रस्त भागाकडे लक्ष नसल्याचं म्हणत मुख्यमंंत्र्यावर जोरदार टीका केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली अर्बन बँकेच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने उद्योजकता प्रोत्साहन आणि प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका केली. सध्याचे मुख्यमंत्री अज्ञानी असल्याचं नारायण राणे म्हणाले आहेत.

साडेतेरा कोटी जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचेच काम महाराष्ट्रातील विद्यमान सरकार करत आहे. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, हे कळतच नाही. केवळ त्यांना वाटतं मी पदावर आहे. मात्र अतिवृष्टी आली, वादळ आलं, दुष्काळ पडला तर केंद्रानेच द्यावं, अशी राज्य सरकारची अपेक्षा असते. मग तुम्ही तिथे कशाला बसलात?. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी आहे का? असा सवालही नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!