Share

मोकाट वराहांना शहराबाहेर हाकला, अन्यथा मालकांवर कारवाई

Published On: 

औरंगाबाद : शहरातील अनेक वसाहतीमध्ये अनधिकृतपणे वराहपालन सुरु आहे. मात्र यामुळे औरंगाबादकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने वराहपालकांना १५ दिवसांची मुदत देत आपला मुक्काम शहराबाहेर हलवण्याची सूचना केली आहे. या मुदतीत वराहांचा मुक्काम न हलवल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे.

शहरात गेली अनेक वर्षे मोकाट कुत्र्यांचा त्रास आहे. मात्र आता कुत्र्यांबरोबरच वराहांचाही त्रास वाढतच आहे. अनेक वसाहतीमध्ये वराह पालन करणाऱ्यांकडून वराह नाल्यात सोडले जातात. मात्र यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. तसेच दुर्गंधी व डासांचा त्रासही वाढत आहे. याविरोधात मनपाकडे अनेक तक्रारी आल्यानंतर मनपाला जाग आली. त्यामुळे मनपाने आता वराहपालन करणाऱ्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

वराहपालकांना १५ दिवसांची मुदत देत वराहांना शहराबाहेर हलवण्याची सूचना केली आहे. या कालावधीत त्यांना मनपा हद्दीबाहेर न काढल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शहरातील जवळपास सर्वच भागात वराह पालन सुरु आहे. यात नारळी बाग, औरंगपुऱ्यातील नाला, मध्यवर्ती बसस्थानक, फाजलपुरा, बेगमपुरा , उस्मानपुरा, एकनाथ नगर याठिकाणी मोकाट वराहांचा सुळसुळाट आहे. शहरात एकूण १० हजार वराह असल्याचा अंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!