नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचा आज ७० वा दिवस आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये कृषी कायद्याबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही. नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांकडून राज्यांमधील तसंच राष्ट्रीय महामार्गावर तीन तासांसाठी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे.
याच पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर संसदेत उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे . या बैठकीत पंतप्रधान मोदींसोबत गृहमंत्री अमित शहा आणि कृषिमंत्री नरेंद्र तोमर उपस्थित आहेत. यामुळे आता या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघतो आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
याआधी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, शेतकरी आणि सरकार यांच्यात फक्त कॉलचे अंतर आहे. शेतकरी व केंद्र सरकार यांच्यात संवादाचा मार्ग नेहमीच खुला आहे. ते म्हणाले होते की, ‘कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी सांगितलेली बाब पुन्हा सांगतो. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये एकमत झाले नसले तरी आम्ही शेतकऱ्यांसमोर पर्याय ठेवलेला आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यात फक्त कॉलचे अंतर आहे.’ अशातच आज होणार्या उच्चस्तरीय बैठकीनंतर केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये पुन्हा चर्चा सुरू होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- रिहानाविरुद्ध आता बॉलीवूडचा खिलाडी, सिंघम मैदानात, गैरसमज पसरवणाऱ्यांनाही सुनावले खडे बोल
- रिहानाच्या ट्विटवर राहुल गांधींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, दिल्लीतील फौजफाट्यावरून मोदींवर टीका
- रस्ता रोको किंवा इतर विरोध प्रदर्शनात सहाभागी झाल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही
- ‘तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही’; जगप्रसिद्ध पॉपस्टारला कंगनाच प्रतिउत्तर !
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
