🕒 1 min read
मुंबई : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक संपताच देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल २५ पैसे प्रतिलिटर आणि डिझेल ३० पैसे प्रतिलिटर महाग झाले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
‘दर महिन्याला भारतात निवडणुका असत्या तर किती बरं झालं असतं…. काही नाही निदान पेट्रोल डिझेलचे भाव तरी स्थिर राहिले असते. पाच राज्यांच्या निवडणुक निकालापासून आजची सलग चौथ्या दिवशी भाववाढ!! सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेब, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय??’ असा टोला लगावत चाकणकर यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय.
दर महिन्याला भारतात निवडणुका असत्या तर किती बरं झालं असतं…. काही नाही निदान पेट्रोल डिझेलचे भाव तरी स्थिर राहिले असते.
पाच राज्यांच्या निवडणुक निकालापासून आजची सलग चौथ्या दिवशी भाववाढ!!
" सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेब, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?? https://t.co/27VYoKIpMj— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 7, 2021
निवडणूक आयोगाने २६ फेब्रुवारीला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली होती. त्यानंतर २७ फेब्रुवारीला पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली होती. नंतर ३ मेपर्यंत दरवाढ झाली नाही. २४ मार्च, ३० मार्च आणि १५ एप्रिलला दरात किरकोळ कपात झाली होती. २ मे रोजी निवडणूक निकाल आल्यानंतर फक्त एक दिवस दिलासा मिळाला. ४ मेपासून पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. गेल्या तीन दिवसांत झालेल्या बदलांत पेट्रोलचे दर ५९ पैसे आणि डिझेलचे दर ६९ पैसे प्रतिलिटर असे वाढले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत हेल्मेट सक्ती प्रकरण, हायकोर्टाकडून पोलिसांची खरडपट्टी
- निवडणूक संपल्याचा परिणाम; सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरवाढ
- ‘कोरोना लसीकरणाची गती कमी होऊ देऊ नका’, पंतप्रधान मोदींचे राज्यांना आवाहन
- रेमडेसिवीर इंजेक्शन गरिबांना सरकारी शुल्कात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
- ‘पुतळ्यांसाठी २० हजार कोटी आहेत, मग लसीकरणाला ३० हजार कोटी नाहीत का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
