Share

मोदींचा ‘भारत’ या संकल्पनेवरच आघात, म्हणून माझा त्यांना विरोध-राहुल गांधी

Published On: 

🕒 1 min read

थिरुवअनंतपुरम : काँग्रेस नेते राहुल गांधी आज केरळ दौऱ्यावर आहेत. तेथील कोझिकोड विमानतळावर काँग्रेसच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर, मलप्पुरम येथे जाऊन हिमा डायलेसिस सेंटरच्या उद्घाटन समारंभात त्यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

राहुल गांधी भाजपला उद्देशून म्हणाले, ‘ते म्हणतात भारत एक राज्य आहे. आम्ही म्हणतो भारत म्हणजे इथले नागरिक आणि त्यांचे परस्पर संबंध आहेत. हे परस्पर संबंध हिंदू-मुस्लिमांमधील आहेत. तसेच हिंदु-मुस्लिम-शीख आणि तामिळ, हिंदी, उर्दू, बंगाली यांच्यातील आहेत. पंतप्रधानांसोबत माझी अडचण हीच आहे की, ते हे परस्पर संबंध तोडत आहेत.’

‘जर भारतीयांमधली नाती पंतप्रधान मोदी तोडत असतील, तर ते ‘भारत’ या संकल्पनेवरच आघात करत आहेत. म्हणून मी त्यांना विरोध करत आहे. आणि त्याचप्रकारे जर ते नाती तोडत असतील, तर भारतीयांमधला दुवा पुन्हा एकदा उभा करणे हे माझे कर्तव्य आणि बांधिलकी आहे’, असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!