🕒 1 min read
मुंबई : मागील काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपा यांच्यात आरोप-प्रत्यारोपाची मालिका बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सामनामधील आपल्या रोखठोक या सदरामधून शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
राज्यात तुरुंगांचेच खासगीकरण झाले आहे का? असा सवाल राऊतांनी विचारला आहे. तसेच आता रेल्वेपासून एअर इंडियापर्यंत सगळेच खासगी झाले. ईडी, सीबीआय, एनसीबी ज्या पद्धतीने काम करतंय, ते पाहाता त्यांचंच खासगीकरण झाल्याचं चित्र आहे. राज्यात याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू असं भाजपाचे नेते सांगतात तेव्हा देशातल्या तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय असा प्रश्न पडतो. मोदी है तो मुमकीन है! हे अशा वेळी खरे वाटते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, पुढे अनिल देशमुख यांच्या अटकेवरून भाजपाला सुनावत राऊत म्हणाले आहेत की,’हवेतल्या आरोपांवर केंद्रीय तपास यंत्रणा राज्याच्या गृहमंत्र्यांना अटक करते आणि पुढच्या २४ तासांत हेच परमबीर सिंग महाशय चांदिवाल आयोगासमोर सांगतात की अनिल देशमुखांविरोधात माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. आरोप करणारा फक्त पळूनच गेला नाही, तर त्यानं आरोपच नाकारले. देशमुख कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय केंद्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत आणि भाजपा त्याबद्दल जल्लोष करते. ही मनमानी, मस्तवालपणा आणि विकृत तानाशाही आहे’,असेही त्यांनी लेखात नमूद केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांची अहमदनगर घटनेची दाखल
- ‘नारायण राणेंनी मिळालेल्या खात्यात आपला परफॉर्मन्स दाखवला नाही तर मंत्रिपद जाईल’
- केजरीवाल सरकारची मोठी घोषणा ; मोफत रेशन योजनेत अजून सहा महिने वाढ
- कोर्टाने वानखेडेंची ‘ती’ याचिका फेटाळली, देशाला सत्य कळायला हवे- नवाब मलिक
- समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं; मलिकांचा गंभीर आरोप

