🕒 1 min read
नांदेड : पीक विमा, मराठा आरक्षणप्रश्नी भाजपकडून दिशाभूल करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. अद्याप पीक विम्याचा हप्ता जमा केला नाही. हे पहिल्यांदाच घडत आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आल्यानंतर सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, पीक विम्यासंदर्भात गैरसमज पसरवण्यात येत आहे. परतावा देण्याचे काम विमा कंपन्या करतात. मागील फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना विम्याचा परतावा नेहमीच कमी मिळाला आहे. हप्त्याच्या पलिकडे जाऊन कधीच परतावा मिळाला नाही. महाविकास आघाडी सरकाच्या काळात २०१९-२० या वर्षात विम्याचे ४ हजार ९२२ कोटी रुपये जमा झाले होते. यावेळी ५ हजार ५३७.२८ कोटींचा परतावा दिला होता. केंद्र सरकारचे अजूनही पूर्ण पैसे जमा झाले नाहीत.
केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करत नाही. गुजरातला पंतप्रधान मोदी यांनी तेथे जाऊन लगेच मदत जाहीर केली. राज्यात पिक विम्याचा बीड पॅटर्न राबवण्याची परवानगी का दिली जात नाही. विमा कंपन्या मोदी सरकारच्या जावई आहेत का? अनेक राज्य विमा कंपनीतून बाहेर पडली पण, आम्हाला बाहेर पडू दिले जात नाही, असा आरोप सावंत यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यातील हत्या झालेल्या कबड्डीपटू मुलीच्या कुटुंबियांचे चंद्रकांत पाटलांकडून सांत्वन
- भारतात द्वेष पसरवणारी माहिती हाताळण्यात फेसबुक असमर्थ
- केंद्र सरकारच्या सुडबुद्धीला पुरून उरणार- दिलीप वळसे पाटील
- प्रशासनात अधिकाऱ्यांनी ‘हो’ आणि राजकारण्यांनी ‘नाही’ म्हणायला शिकणे आवश्यक – मुख्यमंत्री ठाकरे
- पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांकडे तब्बल 100 कोटी बेहिशोबी मालमत्ता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
